मुख्य सामग्रीवर वगळा

दीपावली विशेष लेख मृत्यू ला लाजवणारी कामगिरी असली पाहिजे

दीपावली विशेष लेख मृत्यू ला लाजवणारी कामगिरी असली पाहिजे

Samiti

सार्वजनिक जीवनात काम करत असताना निरपेक्ष अन निस्वार्थी पणे काम करत असताना तसेच कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करत असताना अनेक अडचण येतात असतात कधी अभिनंदन चा वर्षाव होतो तर कधी प्रखर टीका त्यात प्रचंड भीती असते ती बदनामी ची गेली अनेक वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या उन्नती साठी प्रगती साठी तसेच शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता केवळ पत्रकारांच्या हितासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी कौटुंबिक जीवन पणाला लावून व भौतिक सुखाचा त्याग करून पत्रकारांच्या प्रश्नावर कुटुंब बाजूला सारून वारंवार आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करतोय इतकंचं काय अनेक वेळा थेट पोलीस ठाण्यात देखील जाऊन पत्रकारांच्या अडचणी सोडवल्या आहेत अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन वरिष्ठाकडे, मुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री मुख्यसचिव  व थेट मंत्रालयात तक्रारी केल्याने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच चौकशी लागल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत त्याच बरोबर पत्रकारांच्या अडचणीत अनेक अधिकाऱ्यांनी न्याय देण्याची भूमिका बजावली आहे त्यामुळे पत्रकारांचे नेतृत्व करत असतात मला आनंद तर मिळालाचं शिवाय समाधान देखील वाटते

सुख म्हणजे नक्की काय असतं?

याची व्याख्या जरी वेगळी असली तरी मला तर पत्रकारांचे प्रश्न सोडवल्याने यातच माझं खरं सुख आहे असं वाटतं जोपर्यंत आपण इतरांसाठी झगडत नाही संघर्ष करत नाही अडचणीत जात नाही त्याला नेतृत्व करता येत नाही समाज त्याला स्वीकारत नाही किंवा त्याच्या कामाची दखल घेतली जात नाही

मरणाने देखील मान खाली घातली पाहिजे

जो जन्माला आला तो मरणारचं या मधील आंतरात चांगले काम करून नवा आदर्श निर्माण करायला हवा  नावंलौकिक तर होईलचं शिवाय जीवन इतरांसाठी जीवन जगल्याचा आनंद देखील मिळेल

मृत्यू ने देखील शरमेने मान झुकवली पाहिजे

शेवटी आपण किती जगलो या ऐवजी कसा जगलो याला खरा अर्थ आहे आपलं जीवन दुसऱ्यासाठी समर्पित असलं पाहिजे स्वतः साठी आपण जगतोय इतरांसाठी कधी जगणार? मरताना देखील आपल्या इतरांसाठी मी जगलोय आता कोणतीही इच्छा राहिली नाही म्हूणन आंनदाने प्राण सोडले पाहिजे तरच आयुष्यात आपण काहीतरी कमावलं त्याचा हेवा व गर्व वाटला पाहिजे मृत्यूने ला देखील मान खाली घालून आपलं स्वागत केलं पाहिजे तरंच आपलं जीवन आणी मरण सार्थकी झाले असं समजावं

 पत्रकार समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष -यशवंत पवार ✍🏻

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...