मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर २४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समाविष्ट गावाच्या विकासासाठी ५० कोटीचा निधी दयावा -आमदार संजय जगताप यांची आग्रही मागणी

  समाविष्ट गावाच्या विकासासाठी ५० कोटीचा निधी दयावा -आमदार संजय जगताप यांची आग्रही मागणी. पुणे, दि. २८ (प्रतिनिधी) -   पुणे महापालिका हद्दीत नवीन गावे समाविष्ट  झाल्यापासून आजतागायत जुन्या हद्दीच्या तुलनेत नवीन हद्दीत समाविष्ट परिसराचा अतिशय अल्प प्रमाणात विकास झालेला आहे. त्यामुळे या गावाच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी दयावा अशी आग्रही मागणी कॉग्रेसचे आमदार संजय जगताप यांनी आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.  पालिकेतील सत्ताधारी भाजप  विकास निधी बहुतांशी जुन्या हद्दीत राजकिय गणितानुसार वापरत आहे. त्यामुळे  संभाव्य गावांचा परिसर विकासापासून वंचित राहत आहे . त्यामुळे  समाविष्ट गावातील करआकारणी बाबत स्थानिक खासदार, आमदार,लोकप्रतिनिधी,आयुक्त करसंकलन विभाग प्रमुख यांची स्थानिक ग्रामस्थ यांच्या समवेत बैठक आयोजित करावी अशी मागणीही जगताप यांनी केली.  नवीन गावे समाविष्ट  झाल्यापासून आजतागायत जुन्या हद्दीच्या तुलनेत नवीन हद्दीत समाविष्ट परिसराचा अतिशय अल्प प्रमाणात विकास झालेला आहे. विकासाचा मोठा अनुशेष नवीन हद्दीत निर्माण झालेला आहे....

पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी विकास जगताप यांची नियुक्ती

  पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी विकास जगताप यांची नियुक्ती. सोलापूर - पत्रकारिता एक विचार ध्यास चळवळ समजून पत्रकारांच्या अडचणीत नेहमीच धावून जाणारे दिवा (जिल्हा ठाणे ) येथील क्राईम सूत्र चे सह संपादक विकास जगताप यांची पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.   पत्रकारांच्या प्रश्नाची जाण असणारे आक्रमक पत्रकार म्हूणन विकास जगताप यांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली असून परखड लेखन व सडेतोड बातमी मुळे विकास जगताप यांच्यावर हल्ले देखील झाले असून त्यांच्या लेखणीने कधीच खच खाल्ली नसून उलट नव्या दमाने त्यांचे विचार क्राईम सूत्र वृत्तपत्र च्या माध्यमातून मांडत आहेत भटक्या विमुक्त संघर्ष समिती च्या माध्यमातून समाजातील प्रश्न थेट मंत्रालयात जाऊन सोडवण्याच्या त्यांनी नेहमीच प्रयत्न करत असल्याने उत्कृष्ट समाजसेवक म्हूणन त्यांनी नावंलौकिक मिळवला आहे.  त्यांच्या निवडीने पत्रकारांमध्ये नवंचैतन्य निर्माण झाले असून तळागाळातील पत्रकारांचे प्रश्न मंत्रालयात मांडणारा पत्रकार म्हूणन त्यांची ख्याती असून पत्रकारांच्या बाबतीत नेहमीच दक्ष राहून ...

पत्रकार अनिल हुल्ले मारहाण प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीच्या दणक्याने गुन्हे दाखल..

  सोलापुर | विशेष प्रतिनिधी काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनचा पकडून विचारपूस करणाऱ्या सोलापुरातील आवाज महाराष्ट्राचा या न्युज चॅनल मधील पत्रकाराला सात रस्ता परिसरात २४ ऑक्टोंबर रोजी मारहाण झाले असून आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल चे पत्रकार अनिल हुल्ले यांना एका बातमी दाराकडून बातमी मिळाली होती की एक पिकअप छोटा हत्ती गाडी क्रमांक mh२५..P ४९९९ मधून रेशनचा गहू आणि तांदूळ, डाळ, विनापरवानगी बेकायदेशीर विक्रीसाठी सात रस्ता परिसरातून जाणार आहे. पत्रकार अनिल हुल्ले हे सात रस्ता परिसरात गाडीची वाट पाहत उभारले होते… एवढ्यात वरील क्रमांकाची गाडी सात रस्ता परिसरातून जात असताना अनिल हल्ले यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचा इशारा दिला… गाडीमध्ये ड्रायव्हर एक क्लिनर व मागे एक मुलगा असे तीन व्यक्ती होत्या… या छोटा हत्ती गाडीत अंदाजे पाच टन धान्य होते.. सदरच्या रेशनच्या धान्याचा संदर्भात ड्रायव्हरला विचारणा केली असता व कागदपत्रे विचारले असता ड्रायव्हरने पत्रकार अनिल हुले यांना कागदपत्रे दाखले, मात्र ती कागदपत्रे सहा महिन्या अगोदर ची होती.. अनिल हुल्ले यांनी सदर चा मुद्देमाल व गाडी सदर बाजार पोलिस स...

पारधी समाजाला न्याय द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार -:डी.के.साखरे

  मंगळवेढा- पारधी समाजाला न्याय द्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव डी.के.साखरे यांनी दिला आहे.मंगळवेढा तहसील कार्यालयाने 2019 ला पारधी समाजातील नागरिकांना पिवळ्या शिधापत्रिका दिलेल्या आहेत; परंतु त्यांना संबंधित स्वत धान्य दुकानातून अद्याप धान्य दिले जात नाही. जातीचे दाखला मागणी अर्ज देऊनही जातीचे दाखले दिले जात नाही. तसेच त्यांना आधार कार्ड ही मिळत नाही त्यामुळे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पुढाकाराने पारधी समाज बांधवांनी सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ पासून मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करून ही मंगळवेढयाचे स्वप्निल रावडे यांनी त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. तहसील प्रशासनाच्या या नाकर्ते पणाचा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. आज दुसर्‍या दिवशी ही आंदोलन सुरू असल्यामुळे त्यांना उघड्यावरती कडाक्याच्या थंडी मध्ये रात्र काढावी लागत आहे. या आंदोलनास पारधी समाजातील महिलांसह लहान लहान मुलेही बसले आहेत . यावेळी बोलताना साखरे म्हणाले...

सरकारची दिवाळी तर पत्रकारांचे दिवाळे

  सोलापूर प्रतिनिधी: जवळपास दोन वर्षापासून जीवघेणा कोरोना महामारी ने केवळ राज्यात नव्हे जगात धुमाकूळ घातला असून राज्यात कोरोना चे अस्मानी संकट ओढावले केंद्र सरकार अन राज्य सरकार मध्ये समनवय नसल्याने कोरोना चे पडसाद मोठया प्रमाणात उमटले या महामारी ला अटकाव करण्यासाठी संचार बंदी लॉक डाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात आला सर्व व्यवहार व दळणवळण बंद करण्यात आले याचे गंभीर परिणाम केवळ जनतेवर झाले नसून पत्रकारांना देखील याची झळ पोहोचली असून अनेक वृत्तपत्रे बंद पडल्याने पत्रकारांवर उपासमारी ची वेळ आली. अश्या वाईट प्रसंगी वृत्तपत्र च्या मालकांनी पत्रकारांना घरचा रस्ता दाखवला कामावरून कमी करून अश्या वाईट व बिकट परिस्थितीत राज्य सरकार ने पत्रकारांना वाऱ्यावर सोडत कोणतीही मदत केलेली नाही पत्रकारांचे नोंदणी कधी ? देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंचाहत्तर वर्षे झाली परंतु राज्यात पत्रकारांची नोंदणी नसल्याने राज्यात पत्रकार किती ? याची आकडेवारी सरकार कडे नाही शिवाय पत्रकारांची नोंदणी नसल्याने केंद्र सरकार किंवा राज्य सरकार च्या विविध योजनेचालाभ केवळ नोंदणी नसल्याने पत्रकारांना मिळत नाही ...