मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

गोरगरीब रुग्णांसाठी भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष’चा पुढाकार

पुणे – प्रतिनिधी : कालिदास उबाळे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. निनाद संगिता मल्हारी टेमगिरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना वैद्यकीय मदत व मार्गदर्शन करण्यात येत आहे. भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत “भूमाता वैद्यकीय सहाय्यता कक्ष” अंतर्गत महागड्या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय योजना, पंतप्रधान वैद्यकीय मदत निधी, मुख्यमंत्री सहायता निधी तसेच विविध खाजगी ट्रस्ट यांच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडली जाते. यामध्ये गरजू रुग्णांना अल्प दरात अथवा मोफत उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री सहायता निधी योजनेत कॉकलियर इम्प्लांट, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, अस्थिमज्जा व हात प्रत्यारोपण, हिप व गुडघा बदल, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, बालकांच्या शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, डायलिसीस, कर्करोगासाठी किमोथेरपी/रेडिएशन, हृदयरोग, नवजात शिशूंचे आजार, बर्न व विद्युत अपघात अशा व...
अलीकडील पोस्ट

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन

पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन पुरंदरच्या प्रांत अधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यप्रणालीचा निषेधार्थ रिपाइंचे आंदोलन – विष्णुदादा भोसले पुरंदर : पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील महारवतन धारक वर्ग २ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतून कायद्याचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे १२ फूट रुंदीचा रस्ता मंजूर करून पीडित शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान करण्यात आले आहे. ही कारवाई पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी आर्थिक तडजोडीतून अधिकाराचा गैरवापर करत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचप्रमाणे सासवडचे मंडलाधिकारी सुहास कांबळे यांनी खोटा स्थळ पाहणी अहवाल सादर करून संबंधित अर्जदारास मदत केल्याचा गंभीर आरोप आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांकडून करण्यात...

उरुळी देवाचीतील इनाम वर्ग ६-ब महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी जिल्हाधिकारी यांचा कडक इशारा

  पुणे | दि. १२ फेब्रुवारी २०२६ मौजे उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्वे नं. १११, २२१ व २२२/६ या इनाम वर्ग ६-ब महार वतन जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे व अनधिकृत खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ही बाब श्री. अमोल अशोक बहुले यांनी केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आली. प्राथमिक तपासात शासनाच्या संरक्षित जमिनीवर नियमबाह्य व्यवहार व बांधकाम झाल्याचे संकेत मिळाले आहेत. तपास अहवालानुसार— सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे संकेत, जमिनीवर अनधिकृत बांधकाम झाल्याची नोंद, वापर बदलासाठी आवश्यक बिनशेती सारा व ५०% नजराणा शासनाकडे जमा झाला आहे की नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसणे—अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या संदर्भात तहसीलदार, हवेली यांना यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही अहवाल सादर न झाल्याने जिल्हा प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मा. जिल्हाधि...

कामगार हिताच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन

पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्हा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) यांच्या वतीने केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी चार कामगार संहिता लागू केल्याच्या निषेधार्थ १२ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस INTUC महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन शांततामय मार्गाने पार पडले. कामगार हिताच्या दृष्टीने अस्तित्वात असलेले २९ कायदे रद्द करून चार नवीन कामगार संहिता लागू केल्यामुळे कामगारांचे वेतन, नोकरीची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा व संघटन स्वातंत्र्यावर गदा येत असून कामगारांच्या संविधानिक हक्कांना धोका निर्माण झाल्याची तीव्र भावना कामगार वर्गातून व्यक्त करण्यात आली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे जिल्हा INTUC जिल्हाध्यक्ष मा. विजय सुदामराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये पुणे शहर अध्यक्ष मा. अग्रवाल साहेब, हिंद कामगार संघटनेचे सुपेकर साहेब तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले ...

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष विजय जाधव

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना. पुणे : समाजातील गोरगरीब, भटक्या विमुक्त, वंचित व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक पाऊल उचलले आहे. त्यांच्या संकल्पनेतून भैरव क्रांती सेना संचलित भैरव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागांतील भटक्या विमुक्त वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचा ठाम निर्धार या संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. भैरव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, नैतिक मूल्यांची जोपासना तसेच सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहेत. शिक्षणाच्या प्रकाशाने प्रत्येक घर उजळावे आणि समाज सक्षम व्हावा, हा या संस्थेच्या कार्यामागील मू...

सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील व भैरव क्रांती सेनेचे अध्यक्ष विजय जाधव सातारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न

  सातारा : सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांच्या उपस्थितीत भटक्या व विमुक्त जाती-जमातींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर भैरव क्रांती सेनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव यांनी लोणंद, खंडाळा, कोरेगाव, सातारा, फलटण आणि म्हसवड तालुक्यातील भटक्या-विमुक्त समाजासमोरील अडचणी सविस्तरपणे मांडल्या. विशेषतः घरकुल, जमीन हक्क तसेच महत्त्वपूर्ण शासकीय दस्तऐवज मिळविण्यात येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच, “यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना” जलद आणि सुलभ पद्धतीने राबविण्याची मागणी अध्यक्ष जाधव यांनी केली. या मागणीवर जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांनी तत्काळ प्रतिसाद देत, महसूल विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. या बैठकीस प्रदेश संघटक मोहन शिंदे, प्रदेश सदस्य विक्रम पवार, सातारा महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रिया पवार, सुनील चौगुले, फलटण तालुका अध्यक्ष विकास शिंदे, खंडाळा तालुका अध्यक्ष अविनाश पवार, लोणंद शहराध्यक्ष करण चव्हाण, कोरेगाव तालुका अध्यक्ष रवी जाधव...

साताऱ्यात धक्कादायक घटना: महिला डॉक्टरची आत्महत्या, PSIसह दोघांवर बलात्कार व छळाचे गंभीर आरोप

  प्रतिनिधि: सातारा जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र खळबळ उडवली आहे. आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप समोर आले असून या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. नोटनुसार, पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदने यांनी तिच्यावर चार वेळा बलात्कार केला. तसेच प्रशांत बनकर यांनी काही महिन्यांपासून सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचे तिने लिहिले आहे. याशिवाय आरोपींकडून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचा घोर आरोपही समोर आला आहे. या क्रूर आणि अमानुष छळामुळेच आत्महत्येचा टोकाचा मार्ग स्वीकारावा लागला, असा दावा हातावर लिहिलेल्या संदेशातून होत आहे. घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेबाबत दुजोरा लागला असून समाजात संतापाची लाट उसळली आहे. सातारा पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाई होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे. ही घटना पोलिस यंत्रणेची जबाबदारी, सुरक्षा प्रणालीतील त्रुटी आणि स्त्रीसुरक्षेची चिंता पुन्हा अधोरेखित करते. न्याय मिळण्यासाठी नागरिकांच्या अ...