मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हापूर 18-11-2021 ठळक बातम्या ! ताजी बातमी! Kolhapur 15-10-2021-breaking News! Live News



👉कोल्हापूर : ग्रा.पं.  194 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक

  राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यातील 4,554 ग्रामपंचायतींच्या 7,130 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.  यामध्ये जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतींच्या 194 जागांचा समावेश आहे.  या जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यात चंदगड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींमधील ५७ रिक्त पदांचाही समावेश आहे.  22 नोव्हेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.  ७ डिसेंबरला छाननी होईल. ९ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल आणि २२ डिसेंबरला मतमोजणी होईल.

  👉कोल्हापूर : 'कानवा'मध्ये विकणार अंबाबाईच्या साड्या

  ▪️ करवीर निवासी अंबाबाई देवीच्या प्रसादाच्या साड्या लवकरच करवीर नगर वाचन मंदिराशेजारील हॉलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील.  त्र्यंबोली टेकडीवर या साड्यांची विक्री कोरोनाच्या काळात नवरात्रीमध्ये मंदिरे पुन्हा सुरू झाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव गर्दी टाळण्यासाठी केली जात होती;  देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले की, बाहेरून येणाऱ्या भाविकांना याची माहिती नसल्याने मंदिर परिसरालगत असलेल्या 'काणवा'च्या हॉलमध्ये प्रसादाच्या साड्यांची विक्री केली जाणार आहे.


  👉वर्धापनदिन विशेष: शिवाजी विद्यापीठ 'लोकल टू ग्लोबल'

 शिवाजी विद्यापीठाचा आज ५९ वा वर्धापन दिन साजरा होत आहे.  आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या विद्यापीठात शिक्षण घेऊन विद्यापीठाचे नाव जगभर पोहोचवले आहे.  त्यामुळे स्थानिक शिवाजी विद्यापीठाला आता 'ग्लोबल टच' मिळाला आहे.  विद्यापीठाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य कराराद्वारे शैक्षणिक देवाणघेवाण करण्यात मोठी प्रगती केली आहे.  शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे


  

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...