मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हापूर ठळक बातम्या 14-१२-२०२१Kolhapur breaking News!

 👉ओमिक्रॉनसाठी नवी स्ट्रॅटेजी, सोमवारपासून बुस्टर डोसचं बुकींग सुरू

▪️कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन व्हरिएंटचा संसर्ग जगभरात सातत्याने वाढतोय. अशात ब्रिटनने ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी अतिरिक्त उपायांची घोषणा केली. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं की, ब्रिटनमध्ये 30 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी कोरोना लसीचा बूस्टर डोस बुक करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल. Omicron वरील बूस्टर डोसच्या परिणामकारकतेबद्दल प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.रविवारी संध्याकाळी एका राष्ट्रीय प्रसारणात पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, सरकार आता महिन्याच्या अखेरीस 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना बूस्टर डोस देण्याचा प्रयत्न करणार आहे. जानेवारीच्या अखेरीस यूकेमध्ये लसीचे तीन डोस वितरित करण्याचं लक्ष्य होतं. डिसेंबरच्या मध्यापर्यंत ओमिक्रॉन लाट येत आहे. या संदर्भात आपण सतर्क राहायला हवं. बूस्टर डोसमुळे आम्ही लोकांचं रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी करू शकतो. त्यामुळे अनेक मृत्यू टळू शकतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं.


👉नवीन मोटार वाहन कायदा : विनालायसेन्स सापडल्यास ५ हजार दंड

▪️वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आता वाहनधारकांना चांगलेच महागात पडणार आहे. मोटार वाहन कायद्याप्रमाणे (सुधारित) नवीन दराने दंडाची आकारणी होणार असून, ही वाढ दुप्पट ते चौपट करण्यात आली आहे. विनालायसेन्स वाहन चालविणार्‍यांना आता चक्क 5 हजारांची दंडाची पावती फाडली जाणार आहे. तसेच दंड न भरल्यास न्यायालयीन खटलेही दाखल होणार आहेत. शहर वाहतूक शाखेनेही या दंडाची अंमलबजावणी आता सुरू केली आहे.


👉...तर ओबीसी समाज मुस्लीम धर्म स्वीकारायला तयार आहे का; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

▪️गेल्या काही वर्षांमध्ये देशातील ओबीसी समाजाचं जे आर्थिक उत्थान झाले आहे, त्यांना सरकारमध्ये जे काही प्रतिनिधित्व मिळालं आहे, ते आगामी काळात टिकवायचे असल्यास या समाजाने स्वत:ची भूमिका घ्यायला शिकले पाहिजे. धर्मांध पक्षांची कास सोडून स्वतंत्रपणे वाटचाल सुरु केली पाहिजे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षण, मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले.


👉एसटीचे एक लाख कामगार अंगावर आले तर काय कराल?; राज ठाकरे सरकारवर भडकले!


▪️नाशिकमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 'एसटी कर्मचारी हे या वेळी सर्व युनियन्सना बाजूला सारून एकत्र आले आहेत, त्यामुळं सरकारनं त्यांची दखल घ्यायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना इशारे दिले जात आहेत. त्याबद्दल विचारलं असता, 'जनतेनं लोकांच्या भल्यासाठी राज्य दिलं आहे, त्यांच्यावर नेत्यांनी अरेरावी करू नये. कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे. शिवाय, या महत्त्वाच्या मुद्द्यावर ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत, त्या मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांनी बोलायला हव्यात. चार-चार महिने कामगारांना पगार मिळत नाहीत हे काय आहे? जे कर्मचाऱ्यांना बोलतायत त्यांच्या घरी भ्रष्टाचाराचे पैसे आले नाही तर यांचा जीव कासावीस होतो आणि कामगारांची दिवाळी पगाराविना गेली. कसं होणार? अशा परिस्थितीत कामगार असताना तुम्ही अरेरावीची भाषा करताच कशी?,' असं संतापही त्यांनी व्यक्त केला.

प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...