मुख्य सामग्रीवर वगळा

माघारीनंतर 41 उमेदवार रिंगणात; राष्ट्रवादी, भाजपात चुरशीची लढत!Satara Election News

 

माघारीनंतर 41 उमेदवार रिंगणात; राष्ट्रवादी, भाजपात चुरशीची लढत

सध्या राष्ट्रवादी 13, काँग्रेस 4, भाजप 13, शिवसेना 6, तर अपक्ष 5 असं बलाबल आहे.

खंडाळा सातारा : येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी (Khandala Nagar Panchayat Election) ५० जणांनी केलेल्या दाखल उमेदवारांपैकी नऊ जणांनी अर्ज माघारी घेतल्याने ४१ जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व मुख्यधिकारी चेतन कोंडे यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून (NCP) १३, काँग्रेसकडून (Congress) ४, भाजपकडून (BJP) १३, शिवसेनेकडून (Shiv Sena) ६, तर अपक्षाकडून ५ असे बलाबल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे ओबीसी आरक्षण असलेल्या चार प्रभागांत निवडणूक होणार नाही. येथे नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी व भाजपमध्ये दुरंगी लढत होत असून, सर्व १३ प्रभागांत राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार रिंगणात आहे. केवळ चार जागेवर कॉँग्रेस, तर सहा जागेवर शिवसेना लढत देत आहे. काँग्रेसकडून भरलेल्या एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. येथील प्रभाग क्र. १ ,३, ४, व १२ येथे राष्ट्रवादी व भाजप एकमेकासमोर उभे ठाकले आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी, भाजप व अपक्ष अशी लढत होणार आहे. प्रभाग २, ४ व १७ मध्ये भाजप, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने ही आपला उमेदवार उभा केला आहे. यामुळे येथे महाविकास आघाडीची बिघाडी झाली आहे. राष्ट्रवादी, भाजप, कॉँग्रेस व शिवसेना यांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहे.

प्रभागानुसार उमेदवार व कंसात पक्ष पुढीलप्रमाणे : प्रभाग एक - पुष्पा दयानंद खंडागळे (राष्ट्रवादी), छाया सूर्यकांत दुधाणे (भाजप), प्रभाग २- शैलेश प्रताप गाढवे(राष्ट्रवादी), राहुल रवींद्र गाढवे (भाजप), गोविंद गोपाळ गाढवे (शिवसेना), प्रभाग ३- सुधीर चंद्रकांत सोनावणे(राष्ट्रवादी), प्रल्हाद विनायक खंडागळे (भाजप) प्रभाग ४- महेंद्र शांताराम गाढवे (राष्ट्रवादी), योगेश अशोक गाढवे (भाजप) व अमोल नामदेव गाढवे (शिवसेना), प्रभाग ५- संदीप रामदास गाढवे (राष्ट्रवादी),दत्तात्रय गोपाळराव गाढवे (भाजप), संतोष भुजंग देशमुख (अपक्ष), प्रभाग ६ - पल्लवी अमोल गाढवे (राष्ट्रवादी), सविता विकास गाढवे (भाजप), प्रभाग ७ - हर्षद सतीश गायकवाड (राष्ट्रवादी), संदीप प्रकाश जाधव(भाजप), सत्यवान संपत जाधव (कॉँग्रेस), दत्तात्रय गुलाबराव खंडागळे (शिवसेना) व अक्षय मधुकर गायकवाड (अपक्ष), प्रभाग ८- नंदा तात्याबा गायकवाड (राष्ट्रवादी), वनिता सुनील संकपाळ (भाजप), विजया जालिंदर संकपाळ (शिवसेना), प्रभाग ११- मोनिका सूरज मोरे (राष्ट्रवादी), स्वाती अभिजित खंडागळे(भाजप), अनुराधा पंकज गायकवाड (कॉँग्रेस), तर अपक्ष म्हणून ज्योती रवींद्र कांबळे, गौरी विजय घाडगे व मोनाली अतुल गायकवाड, प्रभाग १२- रूपाली प्रवीण गाढवे (राष्ट्रवादी), रेखा सुरेश गाढवे (भाजप), प्रभाग १५- शीतल अमित खंडागळे (राष्ट्रवादी), उज्ज्वला बळवंत खंडागळे (भाजप), प्रियंका सूरज मुळीक (कॉँग्रेस), प्रभाग १६- योगेश मोहन संकपाळ (राष्ट्रवादी), पांडुरंग मारुती खरात (भाजप), रत्नकांत आनंदराव भोसले (कॉँग्रेस), प्रमोद दशरथ शिंदे (शिवसेना), प्रभाग १७- उज्ज्वला प्रवीण संकपाळ (राष्ट्रवादी), सुलोचना भीमाजी संकपाळ (भाजप) व अश्विनी प्रवीण शिंदे (शिवसेना) अशी लढत होणार आहे.

प्रतिनिधी-मोहिनी लोंढे



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...