मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक...अखेर शिवसेनेने पॅनेल केलेच!ओबीसी राजकीय आरक्षणासाठी केंद्राची पुनर्विचार याचिकाऑनलाइन शिक्षणामुळे लिखाणाची सवय मोडली, परीक्षेसाठी अर्धा तास जास्त

 

👉कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक...अखेर शिवसेनेने पॅनेल केलेच!

▪️जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) करण्याच्या प्रयत्नाला अखेर मंगळवारी सुरुंग लागला. एक जागा जादा देण्यास नकार दिल्याने शिवसेनेने मंगळवारी दुपारी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर करत राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन पॅनेलची घोषणा केली. यामध्ये दोन विद्यमान संचालक खा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर आणि विद्यमान संचालक पी. जी. शिंदे यांच्या पत्नी लतिका शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय तालुका विकास सेवा संस्था गटातून भुदरगड व पन्हाळा तालुक्यातील दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पॅनेलमध्ये शिवसेनेसह शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही स्थान देण्यात आले आहे.

👉ओबीसी राजकीय आरक्षणासाठी केंद्राची पुनर्विचार याचिका

▪️स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निश्‍चित केलेले निकष राज्य सरकारांकडून पूर्ण केले जात नाहीत, तोपर्यंत ओबीसींचे आरक्षण पूर्ववत (कायम) ठेवण्याची विनंती याचिकेतून केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील तत्कालीन न्यायमूर्ती के. कृष्णमूर्ती यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारला ‘ट्रिपल टेस्ट’ म्हणजे निकषांची त्रिसूत्री सांगितली होती. तिहेरी मापदंडाच्या या निवाड्यालाही केंद्र सरकार आव्हान देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेश सरकारसमोरही अडचणी उभ्या राहिल्या आहेत. इतर राज्यांसमोरही पेच निर्माण झालेला आहे. ओबीसी आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशात पुनर्विचार याचिका दाखल करून केंद्र सरकार सूचक भूमिका घेणार असल्याचे बोलले जात आहे.

👉ऑनलाइन शिक्षणामुळे लिखाणाची सवय मोडली, परीक्षेसाठी अर्धा तास जास्त

▪️दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दरवर्षी तीन तासांचा असणारा पेपर यंदा साडे तीन तासांचा असणार आहे. होय, यंदा विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी अर्धा तास वाढवून मिळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची  लिखाणाची सवय मोडली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षेसाठी अर्धा तास वाढवून दिला आहे.

👉चिंता वाढली! इस्त्रायलमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू, हवाई वाहतूक रोखली

▪️ओमायक्रॉनने आधीच सगळ्या जगाची चिंता वाढवलेली असताना इस्त्रायलने या चिंतेत भर टाकली आहे. इस्त्रायलमध्ये ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर सरकारने तात्काळ पावलं उचलत हवाई वाहतुकीवर निर्बंध आणले आहेत. याशिवाय कडक निर्बंध लावण्यासंबंधी सरकार विचार करत आहे. AP च्या वृत्तानुसार इस्त्रायलच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी देशात ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू झाल्याचं सांगितलं आह.

प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...