मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हापूर जिल्हा परीषद परिसरात पार्किंगचा प्रश्न गंभीर! Kolhapur News

 

कोल्हापूर जिल्हा परीषद परिसरात पार्किंगचा प्रश्न गंभीर


वाहने ही रस्त्याच्या दुतर्फा लागत आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात आणि वादावादीचे प्रसंग दररोज घडत आहेत.


कोल्हापूर : नागाळा पार्कातील जिल्हा परिषदेच्या(kolhapur jilha parishad) इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रश्‍न(parking) निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या दारातूनच आरटिओ ऑफिस(rto office), विवेकानंद कॉलेज(vivekanand college), तसेच अन्य कार्यालयांकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. यातच जिल्हा परिषदेच्या पार्किंगची व्यवस्था कोलमडली असल्याने सर्व वाहने ही रस्त्याच्या दुतर्फा लागत आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात आणि वादावादीचे प्रसंग दररोज घडत आहेत.

मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सहाशेपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि त्यांच्यासोबत येणारे कार्यकर्ते, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने नियमितपणे जिल्हा परिषदेत येतात. दररोज हजारोंच्या संख्येने लोक जिल्हा परिषदेला भेट देऊन कामांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करतात. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या आवारात केवळ अधिकारी, पदाधिकारी यांचीच वाहने पार्किंगची व्यवस्था आहे, तर कागलकर हाऊसच्या बाजूला उर्वरित वाहने पार्किंगची व्यवस्था केली आहे, मात्र येणाऱ्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत हे पार्किंग तोकडे आहे. सध्या चौथ्या मजल्याचे काम सुरू आहे. याचबरोबर कागलकर हाऊस परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर आहे, मात्र या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.

पार्किंग व्यवस्थेसाठी आर्थिक तरतूदजिल्हा परिषदेच्या कागलकर हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणात रिकामी जागा आहे. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करणे शक्य आहे. पार्किंग व्यवस्था करण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे, मात्र कंत्राटदारांकडून हे काम करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. बांधकाम विभागाकडून सूचना देऊनही चालढकल सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या सभेत कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी, सदस्यांकडून होण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...