मुख्य सामग्रीवर वगळा

कऱ्हाड पोलिसांची ८४ हजार वाहनांवर कारवाई; सिग्नल तोडणाऱ्यांकडून ४२.३६ लाख वसुली! Satara-Karad News

 कऱ्हाड पोलिसांची ८४ हजार वाहनांवर कारवाई; सिग्नल तोडणाऱ्यांकडून ४२.३६ लाख वसुली

कऱ्हाड : शहर पोलिस ठाण्याच्या (karad police station)वाहतूक शाखेने वर्षभरात तब्बल ८४ हजार ५३२ वाहनांवर कारवाई करत वर्षात तब्बल एक कोटी ८१ लाख ४१ हजारांच्या दंडाची वसुली केली आहे. जिल्ह्यात(satara district) सर्वाधिक दंड(fine) वसूल झाला आहे. यंदा लॉकडाउनच्या (lockdown)अखेरच्या काळापर्यंत ३० लाखांच्या दंडाची वसुली केली आहे. नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या सुमारे १५ हजार वाहनधारकांकडून २९ लाख ५२ हजार तर सिग्नल तोडणाऱ्या सहा हजार ४०२ जणांकडून १२ लाख ८४ हजारांच्या दंडाची वसुली पोलिसांनी केली आहे.

शहरात लाखभर वाहनांची आरटीओकडे नोंद(rto registartion) आहे. शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या तितकीच आहे. शहरातील वाहतुकीची समस्या जटिल बनलेली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखा(traffic police) स्वतंत्रपणे कार्यरत आहे. सहायक पोलिस निरीक्षक व ४१ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर त्याची जबाबदारी आहे. त्यांना १९ वाहतूक पॉइंटवर नेमण्यात येते. क्रेनवर एक कर्मचारी असतो. शहरातील वाहतूक नियंत्रण करताना दररोज कामाची विभागणी, साप्ताहिक सुट्या, रजा, कार्यालयीन कामाच्या ताळमेळात पोलिसांना तारवेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे पोलिसांची त्या सगळ्यावर नियंत्रण ठेवत दंडाची आकारणीही असते. तरीही वाहतूक शाखा अग्रेसर आहे. एका वर्षात तब्बल ८४ हजार वाहनांवर कावाई करत पोलिसांनी एक कोटी ८१ लाख ४१ हजारांच्या दंडाची वसुली केली आहे.

पोलिसांनी वसुली केलेल्या दंडाच्या २६ टक्के दंड नो पार्किंगमधून, ३० टक्के दंड ट्रीपलशीट व विना हेल्‍मेट वाहनचालकांकडून तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून दहा टक्के अशी दंडाच्या आकारणी झाली आहे. त्याशिवाय २०० खटले न्यायालयात पाठवून तेथून दंडाची आकारणी केली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ६६ लोकांवर तर रहदारीस अडथळा करणाऱ्या ११७ लोकांवर कारवाई करून त्यांचे खटले न्यायालयात पाठवले आहेत.

प्रतिनिधी-मोहिनी लोंढे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...