मुख्य सामग्रीवर वगळा

साताऱ्याचे ‘मिसाईल मॅन’ उदय देशमुख



साताऱ्याचे ‘मिसाईल मॅन’ उदय देशमुख

सातारा : मराठी माणूस उद्योगात कमी पडतो, या मनोभूमिकेला छेद देत साताऱ्याच्या आैद्योगिक वसाहतीमध्ये अनेक मराठी उद्योजकांनी इनोव्हेटिव्ह कल्पना वापरत आपले उद्योग नेटाने उभे करत अनेकांचे संसार उभे करण्याचे काम केले आहे. अशा या सातारच्या मातीत फुललेल्या उद्योजकांच्या कामांची माहिती आम्ही नवीन वर्षात वाचकांसाठी घेऊन येत आहोत दर सोमवारी..

सातारा येथील आद्योगिक वसाहतीत (satara midc)देशाच्या संरक्षणात महत्त्‍वाची भूमिका बजावणाऱ्या मिसाईलचे पार्ट बनविणारे उद्योजक आहेत असे कोणी म्हटले तर कदाचित आपल्याला आश्‍चर्य वाटेल. पण, हे खरे आहे. सातारा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि उद्योजक उदय देशमुख हे मिसाईलचे पार्ट बनवलेत. या ‘मिसाईल मॅन’ने स्मॉल स्केल उद्योगांमध्ये ग्रीन कंपनीच्या मानांकनातील सर्वोत्कृष्ट असा प्लॅटिनम ॲवॉर्ड मिळवून राज्यभरातील लघु उद्योगांमध्ये साताऱ्याचा मानाचा तुरा रोवला आहे.

उद्योजक व ‘मास’चे अध्यक्ष उदय देशमुख यांच्या ४२ वर्षांच्या अविरत व नावीन्यपूर्ण योजना राबविण्याच्या कष्टाला ग्रीन कंपनी या ॲवॉर्डच्या माध्यमातून फळ मिळाले आहे. कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही छोट्या गोष्टीतून होत असते. प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते, आपल्या मुलाने कुठेतरी नोकरी करावी, छोटे घर बांधावे, अशीच श्री. देशमुख यांच्या आई-वडिलांची देखील अपेक्षा होती. परंतु, त्यांचा मोठा भाऊ व वाहिनीने त्यांना व्यवसायात करिअर करण्याचा सल्ला दिला. तो त्यांनी मानला आणि सुरवात झाली देशमुख उद्योग समूहाच्या प्रवासाला.

शिक्षण पूर्ण करून ते कामाला लागले. १९७९ मध्ये वडगाव शेरी पुणे येथे प्रीमियर सील्स या छोट्या कंपनीची स्थापना केली. या कंपनीमध्ये मेटल कॅप्स बनवण्याचे काम केले जात होते. १९८० मध्ये अपोलो इंडस्ट्री सुरू केली. जगाच्या पटलावर आपलं नाव झाले पाहिजे, या ध्येयाने त्यांनी १९८४ पासून सातारा ही आपली कर्मभूमी निवडत कंपनी सुरू केली. अंगभूत कौशल्याच्या जोरावर माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम त्यांच्या काळात मिसाईलसाठी काम करण्याची संधी त्यांना मिळाली.सर्व कंपन्या सौरऊर्जेवरदेशमुख उद्योग समूहातील सर्व युनिट ही सौरऊर्जेवर नियंत्रित आहेत. ही पहिली अशी कंपनी आहे, जी पूर्णतः सौर ऊर्जेवर चालते. त्यासाठी त्यांनी ६.३, १० व १६ किलोवॅाट क्षमतेची सोलर पॅनल बसवले आहेत.वृक्षांची लागवडदेशमुख उद्योग परिसरात विविध प्रकारची ४२ पेक्षा जास्त प्रजातीची फळ आणि फुलझाडे लावली आहेत त्यामध्ये नारळ, आंबा, चिक्कू , रुद्राक्ष, चाफा जमून, आवळा, सुपारी, बेल व इतर फुलझाडे आहेत. उदय देशमुख यांच्यासह सर्व कामगार त्याची नियमित देखभाल करतात त्यामुळे त्यांच्या सर्व युनिटचा परिसर इतरांहून हरित दिसतो.

प्रतिनिधी-मोहिनी लोंढे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...