मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हापूर ठळक बातम्या 20-02-2022 Kolhapur breaking News!


👉‘पंचगंगे’त मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर

📌कचरा, सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रांमधील रासायनिक पाणी थेट नदीपात्रामध्ये सोडले जात असल्याने पंचगंगा नदी अक्षरश: प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. त्याचवेळी काही लोक मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करत असल्याने नदीपात्रातील जलचरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ब्लिचिंग पावडरच्या साहाय्याने केलेली मासेमारी खवय्यांच्या आरोग्याच्या द‍ृष्टीने धोकादायक आहे. झटपट मासेमारी करण्यासाठी नदीच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून मासेमारी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. काही लोक सायंकाळी मासे मारण्यासाठी येतात. त्यावेळी ते जाळे लावण्याआधी ब्लिचिंग पावडर पाण्यात टाकत असल्याचे नदीकाठच्या शेतकर्‍यांनी सांगितले; तर नदीत पावडर टाकून मासे मारले जात असल्याचे रंकाळा तलावामध्ये मासेमारी करणार्‍या काहींनी सांगितले. काही लोकांकडून होत असलेल्या ब्लिचिंग पावडरच्या वापराचा फटका पारंपरिक मच्छीमारांना बसत आहे.


👉किल्‍ले पन्हाळगडावर शाही थाटात शिवजन्मोत्सव सोहळा. ‘जय भवानी... जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला गड


📌किल्‍ले पन्हाळगडावर छत्रपती ताराराणी महाराज यांच्या राजवाड्यासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात पारंपरिक पद्धतीने व शाही थाटात 395 वा छत्रपती शिवाजी महाराज जन्मकाळ सोहळा साजराझाला.सोहळ्यासाठी पन्हाळगडावरील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनी शिवरायांचा पाळणा गायिला. ज्येष्ठ नागरिक अनंत हवळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यान दिले. आरतीनंतर परंपरेप्रमाणे सुंठवडा वाटप करण्यात आले. शिवजन्मोत्सव काळ सोहळ्यात अबालवृद्ध सहभागी झाले होते.दरम्यान, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील अनेक ठिकाणी 1375 शिवजोती पन्हाळगडावरून प्रज्वलीत करून नेण्यात आल्या. रात्रभर पन्हाळगडच्या पर्यायी रस्त्यावरून शिवभक्‍त मावळे शिवाजी महाराजांच्या जयघोषात ज्योती घेऊन धावत होते. सर्व मावळ्यांना पन्हाळा नगरपालिकेच्या वतीने मानपत्र व श्रीफळ देण्यातआले. शिवजयंतीनिमित्त पन्हाळा युवा प्रतिष्ठान आयोजित रक्‍तदान शिबिरात 86 जणांनी रक्‍तदान केले. संजीवन नॉलेज सिटीमध्ये शिवरायांच्या जीवनावरील पोवाड्याने शिवजयंती साजरी झाली.


👉पुणे-कोल्हापूर विद्युत रेल्वे मार्चमध्ये धावणार

शेणोली ते आदरकी या 112 किलोमीटर विद्युतीकरणाची पाहणी सुरक्षा आयुक्तांकडून येत्या दोन आठवड्यांत करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे ते कोल्हापूर दरम्यान पहिली विद्युत रेल्वे धावणार आहे. यासाठी 55 चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुणे-मिरज-लोंढा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणासह दुहेरीकरण करण्यात येत आहे. तर मिरज-कोल्हापूर आणि मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर सध्या वापरात असलेल्या 327 किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये मिरज-कोल्हापूर दरम्यान विद्युत रेल्वे सुरू करण्यात आली होती.सध्या शेवटच्या टप्प्यातील शेणोली ते आदरकी या 112 किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. यामार्गावर यापूर्वी विद्युत चाचणी देखील घेण्यात आली आहे. याची शुक्रवारी मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून पाहणी करण्यात येणार होती. परंतु ती रद्द करण्यात आली आहे.

प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...