मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हापूर : 480 ग्रामपंचायतींत धुरळा! Kolhapur News Today

 कोल्हापूर : 480 ग्रामपंचायतींत धुरळा!

✒️जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला आहे. या ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. महापालिका, नगरपालिकांपाठोपाठ आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे काम सुरू झाल्याने यंदाचे वर्षे निवडणुकीच्या धामधुमीचेच ठरणार आहे. दि. 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी ही प्रभाग रचना अंतिम करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाHनेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत निवडणुका न झालेल्या 5 आणि जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या 475 अशा एकूण 480 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार सर्व तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक होत असलेल्या गावांची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर केली. या प्रभाग रचनेवर दि. 25 फेHब—ुवारी ते दि. 4 मार्चपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.


👉देशातील आजवरचा सर्वांत मोठा 'IPO', ६५०० कोटी रुपयांचे समभाग खरेदी करण्याची संधी

 

✒️देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी 'एलआयसी' 'आयपीओ' आणण्याच्या तयारीत आहे. सूत्रांHच्या मते हा 'आयपीओ' १० मार्चला गुंतवणूकदारांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 'एलआयसी'तर्फे नुकताच तसा अर्ज 'सेबी'कडे सादर करण्यात आला. त्या विषयी बहुसंख्य ग्राहकांची 'एलआयसी'ची पॉलिसी मध्येच बंद होते. त्याची कारणे अनेक आहेतH. वेळेवर प्रीमियम न भरल्यास किंवा तिचे नूतनीकरण न केल्यास पॉलिसी बंद होण्याची शक्यता असते. अशा बंद झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी 'एलआयसी'तर्फे दिली जाते. हल्लीच 'एलआयसी'तर्फे पाच वर्षांपासून बंद असलेल्या पॉलिसी Hशुल्क भरून चालू करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


👉कोल्हापूर : नगरपालिकांत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

✒️नगरपालिकांच्या निवडणुकांत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणुकांत स्थानिक विकास आघाड्यांचाच बोलबाला असला, तरी त्याआडून नेते आपल्या सोयीचे किंवा कार्यकर्त्यांच्या सोयीने राजकारण करतात. त्यामुळे नेत्यांचा सहभाग व त्याआडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागते. इचलकरंजी नगरपालिकेत भाजपकडे नगराध्यक्षपद होते. तर सभागृहात संमिश्र सत्ता होती. आता तेथे चुरशीचा सामना आहे. आ. प्रकाश आवाडे यांचा ताराराणी पक्ष आहे. ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. भाजपचे तत्कालीन आ. सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून ते निवडून आले. तेथे भाजपमध्येच जुना-नवा असा वाद आहे. या निवडणुकीत आ. आवाडे कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांचे समर्थक भाजपच्या चिन्हावर लढणार की मूळ भाजपवाले त्यांना बाजूला ठेवणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

👉कोल्हापूर : विंचवाच्या नवीन प्रजातीचा शोध

✒️जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील वाघझीरा व खिरोदा या गावात विंचवाची नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. नवीन प्रजाती ही बुथीडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी ही कामगिरी केली.सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आढळलेल्या या प्रजातीचे नाHमकरण ’कॉमसोबुथस सातपुराएनसीस’ असे केले आहे. जगभरात कॉमसोबुथस या जातीच्या 50 प्रजाती आढळून येतात. भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहिली प्रजाती आहे. संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे (जळगाव), सत्पाल गंगलमाले (सोलापूर) आणि अक्षय खांडेकर (सांगली) या संशोधकांचा सहभाग आहे.

प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे









या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...