मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हापूर : 480 ग्रामपंचायतींत धुरळा! Kolhapur News Today

 कोल्हापूर : 480 ग्रामपंचायतींत धुरळा!

✒️जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला आहे. या ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. महापालिका, नगरपालिकांपाठोपाठ आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे काम सुरू झाल्याने यंदाचे वर्षे निवडणुकीच्या धामधुमीचेच ठरणार आहे. दि. 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी ही प्रभाग रचना अंतिम करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाHनेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत निवडणुका न झालेल्या 5 आणि जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या 475 अशा एकूण 480 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार सर्व तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक होत असलेल्या गावांची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर केली. या प्रभाग रचनेवर दि. 25 फेHब—ुवारी ते दि. 4 मार्चपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.


👉देशातील आजवरचा सर्वांत मोठा 'IPO', ६५०० कोटी रुपयांचे समभाग खरेदी करण्याची संधी

 

✒️देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी 'एलआयसी' 'आयपीओ' आणण्याच्या तयारीत आहे. सूत्रांHच्या मते हा 'आयपीओ' १० मार्चला गुंतवणूकदारांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 'एलआयसी'तर्फे नुकताच तसा अर्ज 'सेबी'कडे सादर करण्यात आला. त्या विषयी बहुसंख्य ग्राहकांची 'एलआयसी'ची पॉलिसी मध्येच बंद होते. त्याची कारणे अनेक आहेतH. वेळेवर प्रीमियम न भरल्यास किंवा तिचे नूतनीकरण न केल्यास पॉलिसी बंद होण्याची शक्यता असते. अशा बंद झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी 'एलआयसी'तर्फे दिली जाते. हल्लीच 'एलआयसी'तर्फे पाच वर्षांपासून बंद असलेल्या पॉलिसी Hशुल्क भरून चालू करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.


👉कोल्हापूर : नगरपालिकांत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

✒️नगरपालिकांच्या निवडणुकांत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणुकांत स्थानिक विकास आघाड्यांचाच बोलबाला असला, तरी त्याआडून नेते आपल्या सोयीचे किंवा कार्यकर्त्यांच्या सोयीने राजकारण करतात. त्यामुळे नेत्यांचा सहभाग व त्याआडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागते. इचलकरंजी नगरपालिकेत भाजपकडे नगराध्यक्षपद होते. तर सभागृहात संमिश्र सत्ता होती. आता तेथे चुरशीचा सामना आहे. आ. प्रकाश आवाडे यांचा ताराराणी पक्ष आहे. ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. भाजपचे तत्कालीन आ. सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून ते निवडून आले. तेथे भाजपमध्येच जुना-नवा असा वाद आहे. या निवडणुकीत आ. आवाडे कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांचे समर्थक भाजपच्या चिन्हावर लढणार की मूळ भाजपवाले त्यांना बाजूला ठेवणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

👉कोल्हापूर : विंचवाच्या नवीन प्रजातीचा शोध

✒️जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील वाघझीरा व खिरोदा या गावात विंचवाची नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. नवीन प्रजाती ही बुथीडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी ही कामगिरी केली.सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आढळलेल्या या प्रजातीचे नाHमकरण ’कॉमसोबुथस सातपुराएनसीस’ असे केले आहे. जगभरात कॉमसोबुथस या जातीच्या 50 प्रजाती आढळून येतात. भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहिली प्रजाती आहे. संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे (जळगाव), सत्पाल गंगलमाले (सोलापूर) आणि अक्षय खांडेकर (सांगली) या संशोधकांचा सहभाग आहे.

प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे









या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...