मुख्य सामग्रीवर वगळा

सोमवारी ( दि. ७ ) पुण्यात होत असलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते दरेकर यांना गौरविण्यात येणार आहे.Pune News


महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी ही माहिती दिली. संघटनेच्या वतीने या वर्षीपासूनच पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. दौंड पंचायत समितीचे विद्यमान सदस्य व माजी उपसभापती सुशांत दरेकर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दरेकर हे दौंड तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती असोशिएशनचे अध्यक्ष आहेत. पंचायत समिती मधील कामाचा अनुभव ,अपंग व दिव्यांगासाठी मोफत शिबिरे,साहित्य वाटप, विविध प्रशिक्षणातील सहभाग, मतदार संघात केलेले विकासकामे , विविध बैठकांमधील त्यांची उपस्थिती, सभागृह कामकाजातील सहभाग व प्रभाव, त्रिस्तरीय पंचायत संस्थाच्या हितासाठी विभाग/राज्य पातळीवरील केलेले कार्य, मतदार संघात राबविलेल्या नावीन्यपूर्ण योजना विशेष कामगिरी, कामाची वर्तमानपत्रे व प्रसार माध्यमांनी घेतलेली नोंद, या कार्यासाठी आतापर्यंत मिळालेले सन्मान व पुरस्कार, इतर विभागांच्या योजनांची अंमलबजावणी असे निकष या पुरस्कारासाठी ठेवण्यात आले होते. निकषांच्या आधारे दरेकर यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तसेच राज्यभरातून तीन उपसभापती व दहा जिल्हा परिषद सदस्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पुण्यात येरवडा येथे विमानतळ मार्गावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात सोमवारी संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले, नगरसेवक परिषदेचे अध्यक्ष राम जगदाळे, प्रदेश कार्याध्यक्ष आशिष गोयल उपस्थित राहणार आहेत.

   प्रतिनिधी-सागर चव्हाण 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...