मुख्य सामग्रीवर वगळा

दौंडमधील व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोख रक्कम व मोबाईल लुटून नेणाऱ्या काष्टी येथील दरोडेखोरांच्या टोळीला दौंड पोलिसांनी जेरबंद केले

 दौंड : दौंडमधील व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोख रक्कम व मोबाईल लुटून नेणाऱ्या काष्टी येथील दरोडेखोरांच्या टोळीला दौंड पोलिसांनी जेरबंद केले. दौंडमधील व्यापारी कांतीलाल पारसिया व त्यांच्यासोबत असणाऱ्या मुलाला येथील धनश्री बियर बारसमोर अडवून त्यांच्याकडील रोख रक्कम दरोडेखोरांनी चोरून नेली होती. ओंकार वाघमोरे, सिद्धार्थ आकोटे, समद तांबोळी, व सागर धेंडे (सर्व रा.काष्टी, तालुका श्रीगोंदा) अशी याप्रकरणी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास येथील व्यापारी कांतीलाल पारसिया व त्यांचा मुलगा काष्टी येथील आपले दुकान बंद करून दौंडकडे येत असताना दौंड हद्दीतील सोनवडी गाव परिसरातील धनश्री बिअर बारसमोर दुचाकीवर आलेल्या चार अज्ञात इसमांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा अडीच लाखांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता. तेव्हापासून या गुन्ह्याचा तपास दौंड पोलीस करीत होते.

गोपनीय बातमीदारमार्फत खबर मिळाली की, हा गुन्हा काष्टी येथील आरोपींनी केला आहे. त्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यामध्ये त्यांचे आणखीन दोघे साथीदार सामील असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार या सर्व आरोपीं विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल व इतर आरोपींचा दौंड पोलिसांकडून शोध सुरू आहे. अटक आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिनिधी श्री सागर चव्हाण 


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...