मुख्य सामग्रीवर वगळा

केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पुरंदरमध्ये जल्लोषात स्वागत; सहकारी संस्थांची पाहणी आणि श्रीखंडोबा दर्शन

पुरंदर विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

पुरंदर (जि. पुणे) – बारामती येथे शासकीय दौऱ्यासाठी जात असताना केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ साहेब यांचे पुरंदर विधानसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ आणि घोषणाबाजीद्वारे मंत्री महोदयांचे स्वागत करत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. मंत्री महोदयांनीही या उत्स्फूर्त स्वागताबद्दल सर्वांचे आभार मानले.

या स्वागतप्रसंगी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. शेखर वढणे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्री. साकेत जगताप, सासवड शहराध्यक्ष श्री. आनंद जगताप, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्नेहलताई दगडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

भिवरी येथे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची पाहणी

या दौऱ्यादरम्यान मा. मुरलीधर मोहोळ साहेब व मा. संजय चंदूकाका जगताप साहेब यांनी भिवरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला भेट दिली. त्यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला, अडचणी जाणून घेतल्या आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी, सहकार क्षेत्रातील सुधारणा, आणि सहकार्याच्या नव्या योजना यावर उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली. मंत्री महोदयांनी सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे आश्वासन दिले.

जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन

यानंतर मा. मोहोळ साहेब व जगताप साहेब यांनी जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन घेतले. मंदिर समितीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. पूजाअर्चा करून महाराष्ट्राच्या सुख, समृद्धीसाठी त्यांनी प्रार्थना केली.

दर्शनानंतर त्यांनी जेजुरीतील भाजप पदाधिकाऱ्यांशी विशेष संवाद साधत स्थानिक विकास, कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि पक्षबळकटीकरणाच्या दृष्टीने चर्चा केली.

या संपूर्ण दौऱ्यादरम्यान मंत्री मोहोळ साहेबांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून त्यांनी शासनाच्या विविध योजना आणि सहकार्याबाबत सकारात्मक संवाद साधला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...