मुख्य सामग्रीवर वगळा

भैरव क्रांती सेनेची महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाहीर

 

पुणे (कामठे पाटील नगर), दि. 28 सप्टेंबर –संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भैरव क्रांती सेनेची महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली.

बैठकीत गोरगरीब, शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी आणि कलाकार बांधवांच्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजहितासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त करत, शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रादेशिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करत खालील सदस्यांची निवड करण्यात आली आहे:

 शंकर जाधव - उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश

संजय भोसले उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश 

गोविंदराव अटक - उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश

दिपक कुमावत - सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश

दिनेश गवळी - सचिव महाराष्ट्र प्रदेश 

 दिपक पखाले - सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश 

मोहन निबांळकर - कलाकार समन्वयक महाराष्ट्र प्रदेश 

गोपाल ओरसे - सल्लागार महाराष्ट्र प्रदेश

 मोहन शिंदे - संघटक महाराष्ट्र प्रदेश

 प्रकाश सावंत - समन्वयक महाराष्ट्र प्रदेश   

अनिल ओरसे - सल्लागार महाराष्ट्र प्रदेश 

जगन्नाथ हादवे - सहसरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश महेश हादवे - सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश

सुनील चौगुले - सहसंघटक महाराष्ट्र प्रदेश 

नितीन चव्हाण - प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश 

अंकुश शेगर - 

सहकार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश 

दगडु पवार - 

समन्वयक महाराष्ट्र प्रदेश

पोपट चौगुले - 

सल्लागार महाराष्ट्र प्रदेश 

संस्थापक अध्यक्ष विजय जाधव म्हणाले,“शासनाच्या योजना गोरगरीब, शोषित, वंचित, कष्टकरी, शेतकरी व कलाकारांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. भैरव क्रांती सेना समाजहितासाठी सदैव आघाडीवर राहील.”

अलीकडेच जय भैरवनाथ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुण्यात राबविण्यात आलेले जात दाखला अभियान हे भैरव क्रांती सेनेच्या कार्याचा उत्तम नमुना ठरले. शासनाच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली शेकडो नागरिकांना त्यांच्या हक्कांचे दस्तऐवज मिळवून देण्यात आले.

बैठकीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, संघटना राज्यभर जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, राशन कार्ड आणि इतर शासकीय दस्तऐवज मिळवून देण्यासाठी नागरिकांना मदत व मार्गदर्शन करणार आहे.

शासनाच्या योजना अनेक असल्या तरी दस्तऐवजांच्या अडचणींमुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्या पोहोचत नाहीत. या अडचणी दूर करण्यासाठी भैरव क्रांती सेना राज्यभर ठोस उपक्रम राबविणार आहे.

या निर्णयामुळे हजारो वंचित आणि कष्टकरी बांधवांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. बैठकीतील सर्व ठराव सर्वानुमते मंजूर झाले आणि सदस्यांनी समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...