मुख्य सामग्रीवर वगळा

विजय जाधव यांचा पुढाकार आणि प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ-मुळशी तालुका भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी जात प्रमाणपत्र अभियान यशस्वी



पुणे प्रतिनिधी – मावळ-मुळशीतील भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी जात प्रमाणपत्र अभियान यशस्वीरीत्या पार पडले हे अभियान जय भैरवनाथ सामाजिक सहकारी संस्था चे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या पुढाकाराने आणि मा जिल्हाधिकारी पुणे मावळ-मुळशी चे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले

अभियानाद्वारे मावळ-मुळशीतील शेकडो समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले गेले या कामात प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, मुळशी तहसीलदार विजयकुमार चोबे, नायब तहसीलदार श्री ढमाले, नायब तहसीलदार श्रीमती दर्शना सूर्यवंशी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे वार्ड ऑफिसर श्री ननवरे, गटविकास अधिकारी श्री पंडित, सर्व मंडल अधिकारी आणि ग्रामसेवक यांनी सक्रिय सहभाग घेतला

अभियानाचे आयोजन बावधन येथे प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या दालनामध्ये करण्यात आले या बैठकीत वासुदेव समाज, वडार समाज, नाथपंथी, डवरी, गोसावी समाज यांचे बांधव उपस्थित होते तसेच युवक, युवती, महिला आणि जेष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला विशेष योगदान देणारे थेरगावचे मंडल अधिकारी विष्णू भोसले, मंडल अधिकारी श्रीमती अर्पणा अमोल जमदाडे, चाले ग्रामसेविका श्रीमती व्ही बी केदारी, जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे समन्वयक गोविंदराव अटक, वडार समाजाचे पोपटराव चौगुले, डवरी गोसावी समाजाचे दादाराव सावंत, बेलदार समाजाचे नेते दिपकराव कुमावत, गवळी समाजाचे नेते दिनेशराव गवळी आदी मान्यवर उपस्थित होते

संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी या यशस्वी अभियानाबद्दल समाधान व्यक्त केले आणि सर्व समाज बांधवांचे सहकार्याबद्दल आभार मानले भविष्यात भटक्या विमुक्त जातीसाठी विविध शासकीय योजना आणि माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आमची संस्था सातत्याने करत राहणार आहे असे विजय जाधव यांनी सांगितले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...