मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्रात पहिल्यांदाच हवेली तालुक्‍यातील भटक्या-विमुक्त समाजाला मिळाले फिरते रेशनिंग कार्ड व इतर योजनांचा शासकीय लाभ

 


भैरव क्रांती सेनेच्या पुढाकाराने हवेली तालुक्यात भव्य शिबिर – शेकडो नागरिकांना शासन योजनांचा लाभ

पुणे प्रतिनिधी | हवेली तालुका :

हवेली तहसीलदार कार्यालय आणि भैरव क्रांती सेना यांच्या संयुक्त पुढाकारातून येवलेवाडी येथे भटक्या-विमुक्त जाती-जमातींसाठी एक भव्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच येवलेवाडीतील नागरिकांना फिरते रेशनिंग कार्ड देण्यात आले तसेच संजय गांधी निराधार योजना, विधवा योजना, अपंग योजना यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ त्वरित देण्यात आला.

या शिबिराचे आयोजन तहसीलदार किरण सुरवसे, निवासी नायब तहसीलदार स्वाती नरोटे, तसेच कोंढवा मंडळ अधिकारी संदीप शिंदे, कात्रज मंडळ अधिकारी साधना चव्हाण, श्री. संदिप शिंदे (मंडलअधिकारी कोंढवा) श्री.विकास खोटे (तलाठी),श्री.सुधीर गिरमे (तलाठी),श्री.केतन जाधव,(तलाठी),सुनंदा पाटील (मदतनीस) श्री.तानाजी भोई (मदतनीस),राजेंद्र मसुगडे(मदतनीस)

अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी थेट शिबिरस्थळी उपस्थित राहून नागरिकांचे अर्ज, आवश्यक कागदपत्रे, तसेच योजनांची नोंदणी तात्काळ पूर्ण केली. शिधापत्रिका वाटप, आधार कार्ड व मतदार ओळखपत्र दुरुस्ती, जन्मदाखले, उत्पन्न व रहिवासी दाखले, तसेच आरोग्य व सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

या उपक्रमामुळे नागरिकांना दूरवर असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये जाण्याची वेळ व खर्च दोन्ही वाचले. शासनाच्या योजनांचा थेट लाभ स्थानिक पातळीवर मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले की, हवेली तालुक्यातील हा उपक्रम म्हणजे येवलेवाडी आणि परिसरातील भटक्या-विमुक्त समाजासाठी नव्या युगाची सुरुवात आहे. शासनाच्या सहकार्याने आम्ही समाजातील वंचित घटकांपर्यंत योजना पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार आहोत. लवकरच महाराष्ट्रभर अशा शिबिरांचे आयोजन करून भटक्या-विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत करू. यावेळी भैरव क्रांती सेनेचे प्रमुख पदाधिकारी उपाध्यक्ष संजय भोसले प्रदेश उपाध्यक्ष शंकर जाधव प्रदेश उपाध्यक्ष गोविंद अटक प्रदेश सचिव दिनेश गवळी सरचिटणीस दीपक पकाले मार्गदर्शक अनिल शिंदे महिला उपाध्यक्ष समाज प्रेरक सुजाताताई गुरव प्रदेश प्रवक्ते नितीन चव्हाण महिला प्रदेश सचिव कविता बागल महिला समन्वयक प्रिया विक्रम पवार संघटक मोहन शिंदे सुमन सातपुते सागर पवार विक्रम पवार पोपट चौगुले दीपक कुमावत गोपाल ओरसे मोहन निंबाळकर 

या शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला. स्थानिक नागरिक, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत भैरव क्रांती सेनेच्या कार्याची प्रशंसा केली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...