मुख्य सामग्रीवर वगळा

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव व प्रदेश कार्यकारिणी यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

प्रतिनिधि:पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी साहेब यांच्यासमवेत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव आणि प्रदेश कार्यकारिणी यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भटक्या-विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, यासाठी झालेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

चर्चेला सुरुवात होताच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेबांच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य हेच दर्शवत होते की भटक्या-विमुक्त समाजाचे काम कायदेशीर आणि सकारात्मक मार्गाने पूर्णत्वास जात आहे. त्यांच्या भावनेतून समाधान आणि आनंद दोन्ही झळकत होते.

जिल्हाधिकारी महोदयांनी मागील महिन्यांमध्ये जय भैरवनाथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांच्या मागणीप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, अनेक भटक्या-विमुक्त समाजातील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्टपणे सांगितले की पात्र असलेल्या एकाही नागरिकाला घरापासून वंचित ठेवले जाणार नाही. महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करून हे कार्य वेगाने राबविण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

या बैठकीत नुकत्याच राबवलेल्या जात दाखला अभियान, फिरती शिधापत्रिका आणि विविध शासकीय योजनांच्या शिबिरांविषयी सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकारी यांनी जय भैरवनाथ संस्था आणि भैरव क्रांती सेनेच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले.

या वेळी भैरव क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंकर जाधव, प्रदेश मार्गदर्शक अनिल शिंदे, सचिव दिनेश गवळी, प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव अटक,प्रदेश महिला उपाध्यक्ष गुरव मॅडम, प्रदेश प्रवक्ते पत्रकार नितीन चव्हाण आणि इतर मान्यवर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीचा समारोप समाधानकारक वातावरणात झाला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांनी भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांबाबत प्रशासन व शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या चर्चेमुळे समाजाच्या घरकुल, जात दाखला, फिरती शिधापत्रिका आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी नवा मार्ग खुला झाला आहे. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी जिल्हाधिकारी महोदयांचे मनःपूर्वक आभार मानले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...