मुख्य सामग्रीवर वगळा

पत्रकार अनिल हुल्ले मारहाण प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीच्या दणक्याने गुन्हे दाखल..

 

सोलापुर | विशेष प्रतिनिधी
काळ्या बाजारात जाणाऱ्या रेशनचा पकडून विचारपूस करणाऱ्या सोलापुरातील आवाज महाराष्ट्राचा या न्युज चॅनल मधील पत्रकाराला सात रस्ता परिसरात २४ ऑक्टोंबर रोजी मारहाण झाले असून

Patrakar

आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल चे पत्रकार अनिल हुल्ले यांना एका बातमी दाराकडून बातमी मिळाली होती की एक पिकअप छोटा हत्ती गाडी क्रमांक mh२५..P ४९९९ मधून रेशनचा गहू आणि तांदूळ, डाळ, विनापरवानगी बेकायदेशीर विक्रीसाठी सात रस्ता परिसरातून जाणार आहे. पत्रकार अनिल हुल्ले हे सात रस्ता परिसरात गाडीची वाट पाहत उभारले होते… एवढ्यात वरील क्रमांकाची गाडी सात रस्ता परिसरातून जात असताना अनिल हल्ले यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्याचा इशारा दिला… गाडीमध्ये ड्रायव्हर एक

क्लिनर व मागे एक मुलगा असे तीन व्यक्ती होत्या… या छोटा हत्ती गाडीत अंदाजे पाच टन धान्य होते.. सदरच्या रेशनच्या धान्याचा संदर्भात ड्रायव्हरला विचारणा केली असता व कागदपत्रे विचारले असता ड्रायव्हरने पत्रकार अनिल हुले यांना कागदपत्रे दाखले, मात्र ती कागदपत्रे सहा महिन्या अगोदर ची होती.. अनिल हुल्ले यांनी सदर चा मुद्देमाल व गाडी सदर बाजार पोलिस स्टेशन येथे नेण्यास सांगितले.

त्यावेळी ड्रायव्हरने दोन ते तीन व्यक्तींना बोलावून घेतले. व ती व्यक्ती येऊन तू कुठला पत्रकार आहे? कुठे राहतो? तू आमची शूटिंग का घेतो असे म्हणून धक्काबुकी व बेदम मारहाण करून मोबाईल फोडण्याचा प्रयत्न केला.. मोबाईल खाली पाडले… या वेळी ताबडतोब पत्रकार अनिल हुल्ले यांनी पोलिसांशी संपर्क साधला… मात्र पोलिसांशी संपर्क झाला नाही. शेवटी पत्रकार अनिल हुल्ले यांनी पोलीस आयुक्तालय गाठले.. मात्र तेथे ही त्यांना मदत मिळाली नाही.

अशातच रेशन चा धान्य घेऊन जाणारा गाडीवाला सातरस्ता परिसरातून पसार झाला. या सर्व प्रकरणाची हकीकत सांगण्यासाठी सदर बाजार पोलिस स्टेशन गाठले असता तेथे लवकर फिर्याद घेतली नाही , अखेर पत्रकार अनिल हुल्ले यांनी पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांना फोनवरून माहिती दिली.

पत्रकार सुरक्षा समितीचा दणका
सदर बाझार पोलिस स्टेशन येथे फिर्याद देण्यासाठी पत्रकार अनिल हुल्ले गेले असता पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच पत्रकार अनिल हुल्ले यांनी थेट पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांना फोनवरून माहिती दिली अवघ्या १५ मिनिटात पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार व धसका न्यूज नेटवर्क चे संपादक अक्षय बबलाद यांच्या समवेत पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदाराने मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कलम ३२३ , ५०४ , व ३४ प्रमाणे संबंधितावर गुन्हे दाखल केले आहेत

               संपादक श्री नितीन चव्हाण


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...