मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी ८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उरुळी देवाचीतील इनाम वर्ग ६-ब महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामप्रकरणी जिल्हाधिकारी यांचा कडक इशारा

  पुणे | दि. १२ फेब्रुवारी २०२६ मौजे उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे येथील सर्वे नं. १११, २२१ व २२२/६ या इनाम वर्ग ६-ब महार वतन जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे व अनधिकृत खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाची दखल घेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ही बाब श्री. अमोल अशोक बहुले यांनी केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आली. प्राथमिक तपासात शासनाच्या संरक्षित जमिनीवर नियमबाह्य व्यवहार व बांधकाम झाल्याचे संकेत मिळाले आहेत. तपास अहवालानुसार— सक्षम प्राधिकरणाची परवानगी नसताना खरेदी-विक्री व्यवहार झाल्याचे संकेत, जमिनीवर अनधिकृत बांधकाम झाल्याची नोंद, वापर बदलासाठी आवश्यक बिनशेती सारा व ५०% नजराणा शासनाकडे जमा झाला आहे की नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसणे—अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या संदर्भात तहसीलदार, हवेली यांना यापूर्वी वारंवार पत्रव्यवहार करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही अहवाल सादर न झाल्याने जिल्हा प्रशासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मा. जिल्हाधि...

कामगार हिताच्या होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन

पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्हा राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (INTUC) यांच्या वतीने केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी चार कामगार संहिता लागू केल्याच्या निषेधार्थ १२ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय मजदूर काँग्रेस INTUC महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन शांततामय मार्गाने पार पडले. कामगार हिताच्या दृष्टीने अस्तित्वात असलेले २९ कायदे रद्द करून चार नवीन कामगार संहिता लागू केल्यामुळे कामगारांचे वेतन, नोकरीची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा व संघटन स्वातंत्र्यावर गदा येत असून कामगारांच्या संविधानिक हक्कांना धोका निर्माण झाल्याची तीव्र भावना कामगार वर्गातून व्यक्त करण्यात आली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुणे जिल्हा INTUC जिल्हाध्यक्ष मा. विजय सुदामराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये पुणे शहर अध्यक्ष मा. अग्रवाल साहेब, हिंद कामगार संघटनेचे सुपेकर साहेब तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले ...

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना संस्थापक अध्यक्ष विजय जाधव

भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी भैरव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना. पुणे : समाजातील गोरगरीब, भटक्या विमुक्त, वंचित व दुर्लक्षित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी एक महत्त्वपूर्ण सामाजिक पाऊल उचलले आहे. त्यांच्या संकल्पनेतून भैरव क्रांती सेना संचलित भैरव शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची अधिकृत स्थापना करण्यात आली आहे. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ग्रामीण तसेच शहरी भागांतील भटक्या विमुक्त वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचा ठाम निर्धार या संस्थेमार्फत व्यक्त करण्यात आला आहे. भैरव शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, नैतिक मूल्यांची जोपासना तसेच सामाजिक जाणीव निर्माण करणारे विविध उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार आहेत. शिक्षणाच्या प्रकाशाने प्रत्येक घर उजळावे आणि समाज सक्षम व्हावा, हा या संस्थेच्या कार्यामागील मू...