मुख्य सामग्रीवर वगळा

अनाथ आश्रमाच्या नावावर नागरिकांना लुटण्याचे प्रकार जिल्ह्यात सुरु.Ahamdnagar breaking News



अनाथ आश्रमाच्या नावावर नागरिकांना लुटण्याचे  प्रकार जिल्ह्यात सुरु.

अहमदनगर, :-जिल्ह्यातीलअनाथ आश्रमाच्या नावावर नागरिकांना लुटण्याच्या धंद्याने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला असून देणगीद्वारे जमाझालेले धान्य, कपडे, तेल हे काळ्या बाजारात विकले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.तरी या टोळ्यांवर कारवाई करण्याची मागणी श्री साई सेवा प्रतिष्ठान संस्थेने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्याकडे केली आहे.
या अर्जात म्हटले आहे की, ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह जामखेडद्वारे निराधार लोककलावंत ऊस तोड मजूर,वीटभट्टी कामगार, गोरगरीब वंचित मुलांना मला शिकायचे यानावाखाली देणगी गोळा करण्यासाठी फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना संस्थेने ओळखपत्र, धर्मादाय आयुक्त यांचा शिक्का नसलेले बनावट देणगी पावती पुस्तक,
संस्थेचे ध्येय उद्देश राबवलेले कार्यक्रम, मान्यवर भेटी फोटो
यांची फाईल दर महिन्यास ठराविक रक्कम घेऊन दिली जाते.संबंधित व्यक्ती या अलिशान वाहनाने देणगी गोळा
करण्यासाठी जातात.त्याचा पेहराव हे कार्पोरेट क्षेत्रालाही लाजवेल असे असतात.
मुलांच्या शिक्षणासाठी गणवेश, वह्या, पेन, कंपास, परीक्षा फी,आरोग्य सेवा, खर्च याबरोबर गहू, ज्वारी, तांदूळ, तेल,
नाष्टा, मसाला, भाजीपाला, किराणा यासाठीचा खर्चाच्या स्वरूपात आर्थिक रक्कम स्वीकारली जाते. त्यांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून अनेकजण देणगी देतात.

देणगीद्वारे जमा झालेली रोख रक्कम व शिधा यांची सायंकाळी  आपसात वाटणी केली जाते. शेतकऱ्याचाही बंगला नसेल असे बंगले या लुटारू टोळ्यांनी राहाता तालुक्यातील बाभळेश्वर व सुरेगाव याठिकाणी बांधलेले आहेत.   


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...