मुख्य सामग्रीवर वगळा

मा. यशवंत पवार यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड! Solapur Breaking News

 

 मा. यशवंत पवार यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड.

सोलापूर |(प्रतिनिधी) 

पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय यशवंत पवार यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशन या राज्यस्तरावर  अग्रगण्य असलेल्या शासनमान्य ग्राहक संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली असून प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर नेहमीच आंदोलने , निदर्शने,  निवेदने , तसेच मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे पत्रव्यवहार द्वारे पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडून पत्रकारांच्या उन्नतीसाठी , भल्यासाठी ,कल्याणासाठी , वारंवार संघर्षाची भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केले असून त्यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून प्रभावी संरक्षण कायदा , पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना देऊन , पक्की घरे नसलेल्या पत्रकारांना शासनदरबारी घरकुल मिळणेबाबत , पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण , यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती , कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांना शासकीय मदत , राज्यातील यूट्यूब / पोर्टल या मध्यामांना शासकीय जाहिराती व शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची नोंदणी यासह राज्यातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आक्रमकपणे शासन दरबारी नेहमीच लढाई करत असतात.

 यशवंत पवार हे ग्राहकांच्या देखील प्रश्नांवर कायम आक्रमकपणे संघर्ष करतील अशी अपेक्षा व्यक्त करत व  कार्याची दखल घेऊन ग्राहक कल्याण फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती, ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तुकाराम महाराज निंबाळकर यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे राज्य कार्यवाह विकास महाजन,राज्याचे समन्वय समिती अध्यक्ष सतिश साकोरे,संघटनेचे उपाध्यक्ष रामचंद्र तांबे ,सचिव संतोषबापू मगर ,कोषाध्यक्ष उत्तम झेंडे ,राज्य कार्यकारिणी सदस्य प्रविण गव्हाणे ,सिताराम बवले ,अस्लम तांबोळी ,चिंतामणी  गिरमकर , ग्राहक कल्याण फाऊंडेशन चे सर्व जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र भरातील कार्यकर्ते,

माननीय श्री विकास जगताप भटका विमुक्त संघर्ष समिती अध्यक्ष(ठाणे जिल्हा पत्रकार सुरक्षा समिती उपाध्यक्ष)

नितीन उमाजी चव्हाण भटका विमुक्त संघर्ष समिती सोशल मीडिया प्रमुख (संपादक जागरूक लोकमत)

महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे

भटके-विमुक्त संघर्ष समितीचे सोशल मीडिया सातारा जिल्हा प्रमुख श्री मंगेश सुभाष चव्हाण

श्री सुदेश सुभाष चव्हाण( फिल्मस्टार)

 श्री मोहन शिंदे.सोशल मीडिया उपप्रमुख (उपसंपादक जागरूक लोकमत) 

 जागरूक लोकमत सातारा प्रतिनिधी मोहिनी लोंढे

 जागरूक लोकमत कोल्हापूर प्रतिनिधी स्नेहा डोईफोडे 

पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख श्री किसन सर्जेराव चव्हाण.

श्री अधिक श्रीरंग शिंदे पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया उपप्रमुख

कोल्हापूर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख श्री सागर शेळके

   श्री नितीन सर्जेराव चव्हाण (कोरेगाव तालुका सोशल मीडिया प्रमुख)

यांच्यासह अभिनंदन केलेले आहे. नियुक्ती होताच सन्माननीय यशवंत  पवार यांना महाराष्ट्र राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...