मुख्य सामग्रीवर वगळा

मुबंईत सर्वत्र जुगाराचे अड्डे बंद… मग शाहूनगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीतच कसे सुरु ? मुंबई पोलीस आयुक्त यांना सवाल..? Mumbai News

 मुबंईत सर्वत्र जुगाराचे अड्डे बंद… मग शाहूनगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीतच कसे सुरु ? मुंबई पोलीस आयुक्त यांना सवाल..?

मुंबई विशेष प्रतिनिधी:-

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार लॉकडाऊन संपल्यानंतर काही गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांनी परत शासन आणि पोलिसांचे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे जगाराचे अड्डे सुरु केलेले आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरात पोलिसांनी थेट कारवाही करत जुगाराचे अड्डे बंद केलेले असताना शाहूनगर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायन 90 फीट रोड,कामराज मेमोरीयल हायस्कूल जवळ आणि राधा मेडिकलच्या समोर, नेहरू चाळ, लक्ष्मी चाळ, लेबर कंपाउंड मध्ये रोज ठिकाण बदलून जुगाराचे अड्डे सुरु आहेत.भूमिपुत्राना आणि माध्यमावर्गी यांना देशोधडीला लावणाऱ्या या जुगाराच्या अड्डयावर शाहूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारवाई करण्यास का कचरात आहे ? हा सवाल सध्या मुंबईतील जनतेस पडला आहे. शाहूनगर पोलीस ठाणे, मुंबई यांचे कामगिरीवर प्रश्न चिंन्ह उभा राहिलेले आहे. या अनुषंगाने पुन्हा मुंबई पोलीस यांचे कामगिरीवर प्रश्न चिन्ह उभा राहिले आहे. सर्वत्र मुंबईत जुगाराचे अड्डे बंद असताना शाहूनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातच हे अड्डे कसे सुरु आहेत..? या विषयी शंका व्यक्त कारण्यात येत आहे. शाहूनगर मध्ये रात्रं दिवस बार, जुगाराचे अड्डे , बेकायदेशीर मद्य विक्री, क्रिकेट बेटिंग राजरोसपने सुरु आहे .यामध्ये रोज लाखो रुपयाची उलाढाल होत असून या पैशाचा किती हिस्सा कोणाला आणि किती दिला जातो हा मुंबईतील जनतेचा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय झालेला आहे.

मुंबई पोलिसांना अकार्यक्षमतेचे आणि निशक्रियतेचे धनी करणाऱ्या या जुगाराच्या अड्डेयावर पोलीस आयुक्त यांनी कायदेशीर कारवाई करून ते त्वरित बंद करावेत व अनेक सामान्य जनतेची कुटुंबे उद्वस्थ होण्यापासून वाचवावीत अशी मागणी मुंबईतील तमाम माता भगिनी व मध्यमवर्गीय जनतेची आहे..


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...