मुख्य सामग्रीवर वगळा

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा.Pune News

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा.Pune News

रस्ता, लाईट, ड्रेनेज, अपुरा पाणीपुरवठा , वारंवार खंडित विजपुरवठा या  मुख्य मागण्यासाठी जन आक्रोश मोर्चा....

सुरेश ऊर्फ बाळा कवडे यांच्या नेतृत्वाखाली नागरी प्रश्नावर मोर्चा...

वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, खराब रस्ता, अनिमित होणारा पाणीपुरवठा ,अर्धवट असणाऱ्या ड्रेनेजलाइन त्यातून बाहेर पडणारे मैलायुक्त पाणी, कचर्‍याची गंभीर समस्या, अवेळी उचलला जाणारा कचरा त्यातून होणारी दुर्गंधी, वारंवार वीज पुरवठा खंडित होणे ,विजेच्या खांबावर असणारे धोकेदायक केबल्स तात्काळ काढणे या सर्व नागरी समस्या घेउन आज गोकुळ नगर चौकातून जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. 

मोठ्या संख्येने या मोर्चात तरुण ,महिला, ज्येष्ठ नागरिक, यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. कात्रज कोंढवा रोड वरील नागरिकांना सातत्याने  पाण्यासाठी भांडावं लागतं, खराब ड्रेनेज लाईन व त्यातून रस्त्यावर येणारे मैलायुक्त पाणी, यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं हे आमचं दुर्दैव म्हणावे लागेल. वेळोवेळी खंडित होणारा वीज पुरवठा , गेल्या एक वर्षापासून पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेज चे पाणी मिक्स होऊन सुधा ते पाणी नाइलाजाने येथील नागरिक पितात यावर तोंडी कळवले असताना देखील कोणतीही अंमलबजावणी झाली नाही ही शोकांतिका आहे...

 पुणे महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी, ड्रेनेज लाईन संदर्भात केलेले अधिकाऱ्यांना केलेले फोन टाळले जातात व नागरी समस्येकडे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करतात ही बाब गंभीर आहे , आज नागरिकांच्या प्रश्नावर शांततेच्या मार्गाने केलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ नागरी समस्या सोडवाव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाचे निषेध आंदोलन केले जाईल असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष  सुरेश  ऊर्फ बाळा कवडे यांनी व्यक्त केले.

या आंदोलनावेळी माजी नगरसेविका अमृता ताई बाबर यांनी सर्व नागरिक समस्या जाणून घेतल्या व त्यावर तात्काळ उपाय योजना कराव्यात असे सांगितले. 

आंदोलनाच्या ठिकाणी युवा नेते स्वराज बाबर,उदयसिंग मुळीक, सुनील मोहिते, गौरव कोतवाल, ज्ञानेश्वर वाघमोडे, सरपंच अंकुश  धिंडले, नितीन नाडेकर, कालिदास रेणुसे, इरफान खान, व परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते...

कोट 1

कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या व आज मांडलेल्या नागरी प्रश्नावर  तातडीने उपाययोजना करण्यात येतील. पाणी, ड्रेनेज लाईन, कचरा, या सर्व नागरी समस्या तात्काळ सोडवल्या जातील.. ज्या ठिकाणी  पाण्यामध्ये मैलायुक्त पाणी मिक्स होते ते तात्काळ दुरुस्त केले जाईल.

ज्योती धोत्रे.

साहाय्यक आयुक्त महापालिका 

 कोंढवा येवलेवाडी

 क्षेत्रीय कार्यालय पुणे.

कोट 2

ज्या नागरिकांना वीज बिल वेळेवर भेटत नाहीत त्यांना वीज बिल वेळेवर मिळेल,खांबावर  धोकेदायक असणाऱ्या केबल्स  काढल्या जातील. व भूमिगत केबल टाकून दिल्या जातील.

 ज्या नागरिकांचे थकीत वीज बिल असेल अशा नागरिकांना हप्त्याची  सोय करून दिली जाईल. व नागरिकांना वीज वितरण विभागाकडून सहकार्य केले जाईल...

श्री.शिवलिंग बोरे.

सहाय्यक अभियंता 

कात्रज पुणे

सहसंपादक-मोहन शिंदे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...