मुख्य सामग्रीवर वगळा

भैरव क्रांती सेना व संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव साहेब यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.

पुणे – सेवा हीच ओळख” या तत्वावर काम करणाऱ्या भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव साहेब यांच्या पुढाकाराने कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सर्वप्रथम भैरव क्रांती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ओळख करून देण्यात आली, तसेच संघटनेचे सामाजिक कार्य आणि जनतेशी असलेले नाते अधोरेखित करण्यात आले. यानंतर भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. 

 या चर्चेसाठी रेणके आयोगाचे माजी केंद्रीय अध्यक्ष श्री. बालकृष्ण रेणके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (VJNT विभाग) अध्यक्षा अ‍ॅड. पल्लवीताई रेणके, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिवनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भैरव क्रांती सेना व संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव साहेब यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. या शिबिरामध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजना भटक्या-विमुक्त समाजापर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचतील, याबाबत कायदेशीर मार्गदर्शन देण्यात आले. शासनाच्या तसेच भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. 

 या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आणि संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव साहेब यांनी सर्व पदाधिकारींना समाजातील जबाबदारीची जाणीव करून दिली आणि कार्यकर्त्यांनी सेवाभावाने समाजकार्यात योगदान द्यावे, असे मार्गदर्शन मा. विजय जाधव साहेबांनी समाजातील प्रत्येक कार्यकर्त्याने “सेवा, संघटन आणि संवेदनशीलता” या तीन तत्त्वांवर काम करून समाजाला पुढे नेण्याचे आवाहन केले. प्र.उपाध्यक्ष शंकर जाधव, विलास अटक ,प्र.महिला उपाध्यक्ष समाजप्रेरक सुजाताताई गुरव,प्र.मार्गदर्शक अनिल शिंदे, प्र. समन्वयक विक्रम पवार, सामाजिक कार्यकर्ते संग्राम माळवे व सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...