मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

भटक्या विमुक्त जाती-जमातींची महत्वपूर्ण बैठक कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर यांच्या दालनात संपन्न

भटक्या विमुक्त जाती-जमातींची महत्वपूर्ण बैठक  पुणे प्रतिनिधी : कार्यसक्षम आमदार मा. योगेश अण्णा टिळेकर यांच्या दालनामध्ये जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव तसेच ओबीसी समाजाचे माजी अध्यक्ष संजय टिळेकर यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त जाती-जमातींची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्व समाजाचे समन्वयक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार टिळेकर यांनी भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचे कार्य व समाजकारणाचे कौतुक केले तसेच संस्थेच्या कार्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. आमदार टिळेकर म्हणाले की, “आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून शासन दरबारी भटक्या विमुक्त जाती-जमातींसाठी असणाऱ्या प्रलंबित योजना तातडीने मिळवून देण्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असून मुख्यमंत्री व प्रशासनाच्या मार्फत योग्य त्या उपाययोजना करून न्याय मिळवून देणार आहे.” या बैठकीत भराडी समाजाचे नेते शंकर जाधव, चित्रकथी समाजाचे नेते संजय भोसले, बेलदार समाजाचे नेते दीपक कुमावत, लोहार समाजाचे नेते दीपक पखाले, मरीआई समाजाचे नेते मोहन निंबाळकर, विलास पवार, दगडू पवार, वासुदेव समाजाचे नेते गोविंदरा...
अलीकडील पोस्ट

गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून निषेध — बालगंधर्व रंगमंदिर चौकात तीव्र आंदोलन

  बालगंधर्व रंगमंदिर चौकातील आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्व. राजारामबापू पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते जयंतराव पाटील यांचा केलेला अपमान संतापजनक असल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्त केला. या निषेधार्थ पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व रंगमंदिर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही घोषणाबाजी करून धिक्कार करण्यात आला. या आंदोलनात ॲड. निलेश निकम, किशोर कांबळे, डॉ. सुनील जगताप, डॉ. शशिकांत कदम, रोहन पायगुडे, स्वप्निल जोशी, केतन ओरसे, मनाली भिलारे, विद्या ताकवले, विक्रम जाधव, अजिंक्य पालकर, तानिया साळुंखे, रमिझ सय्यद, प्राजक्ता जाधव, दिलशाद अत्तार, शैलेंद्र बेल्हेकर, आसिफ शेख आदींसह शहरातील पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सासवडमध्ये वीर येलोजी गोठे समाधीस्थळ वाचवण्यासाठी बेमुदत उपोषण – पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नेतृत्वाखाली लढा

सासवडमध्ये वीर येलोजी गोठे समाधीस्थळ वाचवण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) : मातंग समाजाचे व स्वराज्याचे शिलेदार वीर येलोजी गोठे यांच्या समाधीस्थळावरील अतिक्रमणाविरोधात तसेच संवर्धनाच्या मागणीसाठी नगरपरिषदेसमोर ११ सप्टेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले आहे. हे उपोषण पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नेतृत्वाखाली सुरू असून युवक राज्याध्यक्ष मनोज दादा भिसे मार्गदर्शन करीत आहेत. उपोषणाद्वारे समाधीचे काम पूर्ण करणे, परिसरातील अतिक्रमण हटवणे आणि वीर येलोजी गोठे यांचा पुतळा उभारणे या प्रमुख मागण्या व्यक्त केल्या आहेत. समाधीस्थळाची विटंबना होत असल्याने हा प्रकार अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची मागणीही उपोषणाद्वारे केली जात आहे. या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे अधिकृत पाठिंबा देण्यात आला आहे. युवक अध्यक्ष स्वप्निल पाटोळे व कार्याध्यक्ष कालिदास उबाळे  उपाध्यक्ष सचिन कांबळे यांनी समर्थन पत्र सादर केले. ✦  मुख्य मागण्या समाधीस्थळावरील...

भटक्या विमुक्त समाजाला अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाचे रि. पोलीस उपाधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांचा संघाचा जाहीर पाठिंबा

मुंबई – नाथपंथी डवरी गोसावी समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या ठाम मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता आणखी बळ मिळाले आहे. अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज संघाचे रिटायर्ड पोलीस उपाधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. समाजाची मागणी स्वातंत्र्यानंतरही भटका विमुक्त  नाथपंथी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिला आहे. शिक्षण, नोकरी आणि मूलभूत सुविधा यांचा समाजातील मोठ्या घटकाला अद्याप लाभ मिळालेला नाही. आज काही तरुण शिक्षण घेऊन पुढे येत असले तरी शासनाकडून आरक्षणाच्या स्वरूपात योग्य पाठबळ मिळाल्यास ही प्रगती गतीमान होईल, असा ठाम विश्वास समाजाने व्यक्त केला आहे. या मागणीसाठी आझाद मैदान, मुंबई येथे भटक्या विमुक्त समाज उपोषण करत आहे. या उपोषणाचे नेतृत्व पद्मश्री लक्ष्मण माने करत असून शासनाने तातडीने समाजाचा समावेश एस.टी. प्रवर्गात करावा, अशी मागणी त्यांनी स्पष्ट शब्दांत केली आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देताना मच्छिंद्र चव्हाण यांनीही स्पष्ट केले की, “समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणाची अंमलबजावणी काळाची गरज आहे. शासनान...

भटक्या विमुक्तांच्या प्रलंबित योजना मार्गी लावण्यासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

पुणे प्रतिनिधी – भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या प्रलंबित योजनांबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी साहेब यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन आणि पुढाकार जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी घेतला. समाजाच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लढा देणाऱ्या विजय जाधव यांच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर जात प्रमाणपत्रे मिळाल्याने समाजात अपार आनंदाचे वातावरण आहे. विजय जाधव यांनी सांगितले की, या निर्णयामुळे भटक्या-विमुक्त बांधवांना शासनाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचवेळी जिल्हाधिकारी साहेबांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यासंदर्भात तातडीने आदेश दिले असून, शासनाच्या सर्व योजना तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतील, यासाठी महसूल विभाग पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले. या बैठकीत खालील महत्त्वाच्या योजना आणि कागदपत्रांच्या अटी सोप्या करण्याबाबत चर्चा झाली : फिरते रेशनिंग कार्ड विधवा परितक्ता अंध-अपंगत्व यो...

जेजुरीत नाथपंथी डवरी गोसावी समाजाला जात प्रमाणपत्र – विजय जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

जागरूक लोकमत समाचार जेजुरी (पुरंदर तालुका): शिवमल्हार मार्तंड खंडेरायाच्या नगरी जेजुरी येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाला अखेर जात प्रमाणपत्र मिळाले असून हा नगरपरिषद कार्यक्षेत्रातला राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग ठरला आहे. गेल्या कित्येक दशकांपासून हा समाज जेजुरीत वास्तव्य करत असून मार्तंड मल्हारीची सेवा, जागरण-गोंधळाची पारंपरिक कला सादर करत शिवकालीन संस्कृती जपत आहे. मात्र, जात प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून समाज वंचित होता. जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी या समाजाच्या प्रश्नाची दखल घेतली. पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुड्डी, पुरंदर उपविभागीय अधिकारी मा. वर्षा लांडगे, तहसीलदार राजपूत साहेब, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. इंगवले, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, महसूल नायब तहसीलदार मा. वाघ, मंडल अधिकारी मा. बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे जेजुरीतील नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळाले. या ऐतिहासिक यशामुळे समाजातील बांधवांनी...

सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्हा सरचिटणीस पदापर्यंतचा प्रवास

  गणेश दुर्योधन भोसले यांचे सेवाभाव आणि निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण भाजप संघटनेतील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून आज गणेश दुर्योधन भोसले हे भाजप पुणे ग्रामीण दक्षिण विभागाचे जिल्हा सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत. संघटनेत लहानमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी नेहमीच “कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता” अशी ओळख जपली. महिलांसाठी उपक्रम राबवणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे या कामातून त्यांनी समाजाशी थेट नाळ जोडून ठेवली आहे. लोकांच्या अडचणी ऐकून त्यावर तोडगा काढणे हेच त्यांचे खरे बळ ठरले. याच सातत्यपूर्ण सेवाभाव आणि अथक प्रयत्नांची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साहाचे वातावरण असून, गणेश दुर्योधन भोसले यांचा प्रवास समर्पण, निष्ठा आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. Full Width Line                 संपादक - नितीन चव्हाण